छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे:- पोलीस निरीक्षक सचिन यादव


नळदुर्ग :-  छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य महान असुन त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे जयहिंद प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे असे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन करतांना म्हटले आहे.6 जुन रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नळदुर्ग येथे जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय बताले यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी,  शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण,  सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, भाजपचे सुशांत भुमकर, सतीश पुदाले, सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार धिमाजी घुगे,संजय जाधव, विलास येडगे. पद्माकर घोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश पिस्के,गवळी गुरुजी आदिजण उपस्थित होते.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व दीप प्रज्वलीत करुन रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बोलतांना पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रीत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आज प्रत्येकानी आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे गरजेचे आहे. त्यांचे दर्शन घेऊनच प्रत्येक कार्याची सुरुवात करावी.जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय बताले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे हे त्यांचे कार्य कौतुकास्पद व समाजाला प्रेरणा देणारे आहे. आज अशा कार्याची समाजाला गरज असुन असे कार्यक्रम प्रत्येकानी आयोजित करावे असेही शेवटी यादव यांनी म्हटले आहे. प्रास्ताविक करतांना संजय बताले यांनी म्हटले की, मी स्वता 33 वेळा रक्तदान केले आहे. अनेक गरजु गरीब रुग्णांना त्यांना गरज पडली तेंव्हा मोफत रक्त मिळवुन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे हे आठवे वर्ष असुन दरवर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत गेली आहे. रक्तदात्यांमुळेच रक्तदान शिबीर आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे संजय बताले यांनी म्हटले आहे.यावेळी शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना संजय बताले यांच्या कार्याचा गौरव केला. या रक्तदान शिबिरात रक्त संकलन करण्याचे काम सोलापुर येथील शिवशंभो ब्लड सेंटर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवशंभो ब्लड सेंटरच्या वतीने सोमनाथ बिराजदार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजक जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी, संदीप सुरवसे, समीर मोरे, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह नागरीक उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात 134 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी जयहिंद प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. 



Post a Comment

Previous Post Next Post